Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा कोरोना अहवालात आज दिवसभरात सोमवारी २१७ बाधित रूग्ण आढळूले आहे. तर ८९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. यात जळगाव शहरात-८८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ -६०, अमळनेर-९, चोपडा-२०, पाचोरा-५, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-५, पारोळा-५, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-३, बोदवड-० असे एकुण २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४५ हजार ३७६ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४७ रूग्ण बरे…

Read More

गहू, ज्वारी,मका उत्पादनावर आहे शेतकर्‍यांची मदार  जळगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यात रब्बी हंगामांतर्गत गहू, ज्वारी, बाजरी, मका यासह रब्बी वाणांची २लाख ३४हजार १०४ हेक्टर सरासरी ११७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाच्या सुरूवातीस बेमोसमी पावसाने तुरळक ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली होती. परंतु या बेमोसमी पावसाचा काही अंशी रब्बी पिकांच्या पेरणीस फायदाच झाला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा दिडपटीने झालेल्या अती पावसामुळे कपाशी, ज्वारी बाजरी आदी पिके हातची गेली तर पुर वा अतीपावसामुळे सुमारे ६ ते सात हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात ज्वारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भाजपाचे पदाधिकारी आणि कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमेत पाचोरा तालुक्यात एका सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता माजलेले रक्त असे वक्तव्य केल्याने जळगाव ग्रामीण तालुका युवासेनेतर्फे आज तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन यापुढे जळकेकर महाराज यांचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख सचिन चौधरी , विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड , राकेश चौधरी,अतुल घुगे,निलेश वाघ,केतन पोळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नामोल्लेख न करता धरणगाव विधानसभेचा उल्लेख केलेला…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नाशिक जिल्ह्यातील धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. दराबाबत कांदा हे पीक कीती लहरीपणाचे आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. पण याच पिकामुळे जेव्हा घर उभा राहते तेव्हा काय घडते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी बंधूंनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. ऊसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा कांदा लागवडीचा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात रविवारी 16 जानेवारी सकाळपासून नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम सुरू केली असून यात संबंधीतांना दंड ठोठावण्यात येत आहे. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढीस लागली आहे. या अनुषंगाने आरोग्य प्रशासन सर्तक झाले असुन, जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये यावल नगर परिषद प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्तपणे कोवीड१९चे नियम न पाडण्यार्‍यांवर नागरीकांवर कार्यवाहीस सुरूवात केली आहे. यावल शहरातील बुरूज चौकात आज सकाळ पासुन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये नगर परिषदचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांच्या व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व स्थानिक पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण, राहुल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोरोना संकटकाळात संचारबंदीमुळे अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी आली असल्याने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठी एकल कलाकार अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभासाठी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सांस्कृतिक व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी ही राज्य शासनने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एकल कलाकार एकरकमी अर्थ सहाय्य योजना सुरू केली असुन याकरिता तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य योजनेचे अर्ज प्राप्त करावे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून या समितीचे तालुका पातळीवरील अध्यक्ष तहसीलदार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, समितीचे सचिव सहाय्यक गटविकास अधिकारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पस्तीस वर्षापूर्वीच जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा रविवारी १६ जानेवारी रोजी 11 वाजता घडवून आणला मेळाव्याला ३५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आदर्श विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी हे शासकीय निमशासकीय, व्यवसायिक, शेतकरी या दर्जातील होते. राज्यभरात विखुरलेले सर्व विद्यार्थी एकत्र आणण्याचे काम तुकाराम सोनवणे व डॉ. शोभना तळेले यांनी केले. या दुग्धशर्करा कार्यक्रमात तिन दशकानंतर आपल्या विद्यार्थ्यांना विद्यालयात पुनश्च पाहुन अक्षरशः सेवानिवृत्त शिक्षकांचे डोळे पाणावले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील तर मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक एल.एम. चोपडे उपस्थित होते. प्रास्ताविक सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी गोकुळ पाटील, प्रवीण…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील एका भागातील तरुणीला तरुणाने फोनवरुन तुला मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु जर मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकून अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रेहान शेख रा. जुने जळगाव याच्याविरोधात शनिवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, १९ वर्षीय तरुणी जळगावातील एका भागात राहते. ६ जानेवारी रोजी सायंकाळी रेहान शेख याने तरुणीला मोबाईलवरुन संपर्क साधला. तसेच तु मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु जर मला भेटली नाही तर तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली. याप्रकाराने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबी थंडीने धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपासुन सुर्यदर्शन झालेले नाही. गुलाबी थंडीने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात आणि इतर ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी काही प्रमाणात धुके पडले आहे. पारा घसरल्याने तसेच सुर्यदर्शन नसल्याने गारठा कायम आहे. थंड हवा वाहत असल्याने थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवुन थंडीपासून बचाव केला जात आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोविड काळात वाढता वैद्यकीय खर्च आणि लॉकडाउनमुळे वेतन कपात यामुळे नोकरदारांसमोर मोठे संकट ओढावले. आपण जर कोवीड पॉलीसी घेण्याच्या विचारात असल तर एकदा ही बातमी वाचा. आगामी काळात इन्श्युरन्स पॉलिसीच्या संरचनेत अनेक बदल होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात वैद्यकीय खर्च आणि लॉकडाउनमुळे वेतन कपात केल्यामुळे कामगार व नोकरदार यांच्यासमोर मोठे संकट ओढावले आहे.इन्युरन्स पॉलिसीमुळे लाखो रुपयांचा वैद्यकीय बिलांचा भार सहन करणे शक्य ठरते. त्यामुळे इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीकडे अनेकांचा वाढता कल असतो. मात्र, कोविड काळात वाढते डेथ क्लेम आणि पॉलिसी क्लेमच्या संख्येमुळे इन्श्युरन्स कंपन्यांचे बजट कोलमडले आहे. इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अन्य आजारांसाठी असणारा प्रतीक्षा कालावधी कोविड इन्श्युरन्स धारकांसाठी…

Read More