लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया ही संतप्त असून याचा शिवसेनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करीत असून हभप जळकेकर महाराज यांनी तोंड सांभाळून बोलावे अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी दिली आहे. खासदार उन्मेश पाटील यांच्या गिरणा परिक्रमासंदर्भात पाचोरा येथे कार्यक्रमात हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जिल्ह्यात या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला होता. याबाबत जिल्हाप्रमुख हर्षल माने म्हणाले की, आपण काय होतात. राहिला प्रश्न राजकारणाचा हे पूर्ण जिल्हास ध्यात आहे. आपणास कोणी घडविले, आपणास कोणी मोठे केले, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पात्रता…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । महाविकास आघाडीने घाईघाईत विद्यापीठ कायद्यात बदल केले असून आता प्रत्येक विद्यापीठात प्र- कुलगुरू यांची नियुक्ती होणार आहे. नियुक्ती म्हणजे शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून विद्यापीठातील सर्व कामकाजामध्ये राजकीय ढवळाढवळ केली जाणार आहे. विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी धरणगाव तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर निषेध करण्यासाठी जात असतांना धरणगाव पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी कार्यकर्त्यांना जाण्यास प्रतिबंध करून नोटीस देऊन थांबवले या प्रसंगी भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पवार, सरचिटणीस टोनी महाजन, सरचिटणीस सचिन पाटील, शहराध्यक्ष भूषण कखंरे, उपाध्यक्ष विशाल पाटील, गोपाल…
नांदेड वृत्तसंस्था । दहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हा प्रकार नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथे उघडकीला आला आहे. संशयित आरोपी देखील ११ वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या ११ वर्षांने बलात्कार केल्याचा आरोप होत आहे आहे. या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याची भीती या घटनेमुळे व्यक्त होत आहे. दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अल्पवयीन मुलाच्या…
प्रतिनिधी प्रविण पाटील : तालुक्यातील विटनेर येथील शेतकरी यांनी राहत्या घरात विषारी द्रवण शेवन केले होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. विटनेर येथील गोकुळ पांडुरंग वराडे( वय ४९) हे 14 जानेवारी शुक्रवार रोजी आपल्या घरच्या शेतात फवारणीसाठी गेले होते सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास त्यांनी विषारी द्रवण शेवन केले होते त्यानंतर त्यांना उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना काल रात्री रविवार १६जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवलीमयत गोकुळ वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून सन २०२०/२०२१मध्ये शेतासाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले आहे गोकुळ वराडे यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात गट नंबर २९९/१/२/१अ/१हि २०आर व २९९/१/२/अ/१/२हि ६०आर असे एकूण…
धरणगाव प्रतिनिधी : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हभप जळकेकर महाराज यांचा शिवसेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पालकमंत्र्यांची प्रतिमा मलीन करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिलेजाईल असा इशारा धरणगाव युवासेना उपशहर प्रमुख विलास महाजन यांनी दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व किर्तनकार हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पाचोरा तालुक्यात खा. उन्मेश पाटील यांच्या गिरणा परिक्रमेच्या संदर्भातील एका सभेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे नाव न घेतला “माजलेले रक्त” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. हभप जळकेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नामोल्लेख…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ तीन जिल्ह्यापुरताच मर्यादीत असल्याची टिका करणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर फडणवीसांना शरद पवारच काशीचा घाट दाखवतील अशा इशारात राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा केवळ पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं म्हणून त्यांचा पक्ष राष्ट्रवादी होत नाही. शरद पवार यांचा पक्ष असा आहे, ‘पानी तेरा रंग कैसा, जिस मे मिलाए उसके जैसा’. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी तृणमूल काँग्रेसशी बोलणी करतात. त्याच्या पक्षाचे अस्तित्व राष्ट्रीय नाही, त्यांच्याकडे राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी तो…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा कोरोना अहवालात आज दिवसभरात सोमवारी २१७ बाधित रूग्ण आढळूले आहे. तर ८९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. यात जळगाव शहरात-८८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ -६०, अमळनेर-९, चोपडा-२०, पाचोरा-५, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-५, पारोळा-५, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-३, बोदवड-० असे एकुण २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात २१७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४५ हजार ३७६ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ५४७ रूग्ण बरे…
गहू, ज्वारी,मका उत्पादनावर आहे शेतकर्यांची मदार जळगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यात रब्बी हंगामांतर्गत गहू, ज्वारी, बाजरी, मका यासह रब्बी वाणांची २लाख ३४हजार १०४ हेक्टर सरासरी ११७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाच्या सुरूवातीस बेमोसमी पावसाने तुरळक ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली होती. परंतु या बेमोसमी पावसाचा काही अंशी रब्बी पिकांच्या पेरणीस फायदाच झाला असल्याचे दिसून आले आहे. गेल्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा दिडपटीने झालेल्या अती पावसामुळे कपाशी, ज्वारी बाजरी आदी पिके हातची गेली तर पुर वा अतीपावसामुळे सुमारे ६ ते सात हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात ज्वारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भाजपाचे पदाधिकारी आणि कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमेत पाचोरा तालुक्यात एका सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता माजलेले रक्त असे वक्तव्य केल्याने जळगाव ग्रामीण तालुका युवासेनेतर्फे आज तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन यापुढे जळकेकर महाराज यांचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख सचिन चौधरी , विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड , राकेश चौधरी,अतुल घुगे,निलेश वाघ,केतन पोळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हभप जळकेकर महाराज यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नामोल्लेख न करता धरणगाव विधानसभेचा उल्लेख केलेला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नाशिक जिल्ह्यातील धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. दराबाबत कांदा हे पीक कीती लहरीपणाचे आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. पण याच पिकामुळे जेव्हा घर उभा राहते तेव्हा काय घडते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी बंधूंनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. ऊसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा कांदा लागवडीचा…

