Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुण-तरुणीने केली एकाच घरात आत्महत्या ; बुधवार पेठेत झाली होती ओळख !
    क्राईम

    तरुण-तरुणीने केली एकाच घरात आत्महत्या ; बुधवार पेठेत झाली होती ओळख !

    editor deskBy editor deskDecember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    पुण्यातील एका परिसरात एका महिलेने व तरुणाने एकाच घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३२ वर्षीय बरखा मंडल आणि 31 वर्षीय राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. कात्रज परिसरात ही घडना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा मंडल आणि राजू फारुख शेख या दोघांनीही एकाच घरात आत्महत्या केली आहे. दोघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही आहे. बरखा आणि राजू यांची बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत ओळख झाली होती. दोघांनीही चार दिवसांपूर्वीच कात्रज परिसरात भाड्याने रुम घेतली होती. त्यामुळे घरासंदर्भात कोणतंही अग्रीमेंट करण्यात आलं नव्हतं. या घराचा दिवसभर दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी दरवाजा ठोकून आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही आतून कोणी दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी ताबडतोब भारती विद्यापीठ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडून घराची पाहणी केली. राजूने घराच्या हॉलमध्ये तर बरखाने घराच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांना आढळलं.

    बरखा ही मुळची पश्चिम बंगालची आहे. राजू हा पुण्याचा आहे. दोघांचीही पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत ओळख झाली होती बरखा हिची मुले आणि पती आहेत. ते तिघेही मागील अनेक वर्षांपासून पश्चिम बंगामध्येच राहतात. चार दिवसांपूर्वीच भाड्याने घेतलेल्या रुममध्ये दोघांत काय घडलं आणि आत्महत्येचं नेमकं कारण काय असेल? याचा पोलीस शोध घेत आहे.

    बरखा आणि राजू यांच्या आत्महत्येनंतर दोघांचेही मोबाईल भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या मोबाईलचा तपास पोलीस करत आहे. या मोबाईलमधून आत्महत्येचं कारण समोर येईल का? हे बघावं लागणार आहे. या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरमालकांनी अॅग्रीमेट केलं नसल्यामुळे दोघांबाबतही अधिक माहिती मिळत नाही आहे. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अनेकांनी या घटनेची धास्ती घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.