Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणांनो : आताच करा अर्ज ; लाखो रुपये कमविण्याची संधी
    कृषी

    तरुणांनो : आताच करा अर्ज ; लाखो रुपये कमविण्याची संधी

    editor deskBy editor deskAugust 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ने व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitmentfci.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.

    या भरतीद्वारे एकूण ११३ पदे भरली जातील. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२२ आहे.

    रिक्त जागांचा तपशील
    एकूण पदे – ११३

    महत्त्वाची तारीख
    ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २७ ऑगस्ट २०२२
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर २०२२

    वय मर्यादा
    व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांचे वय २८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत दिली जाईल.

    शैक्षणिक पात्रता
    व्यवस्थापकाच्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.

    निवड प्रक्रिया
    या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत या दोन टप्प्यांतून जावे लागेल.

    पगार
    निवडल्यास, उमेदवारांना पगार म्हणून ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपये दिले जातील.

    अर्ज फी
    सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ८०० रुपये भरावे लागतील तर, SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोयाबीन तेजीत, पण शेतकऱ्यांच्या हाती नाही माल

    January 23, 2026

    राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच छताखाली; कृषी समृद्धी योजना वेगाने राबविणार !

    November 26, 2025

    पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : “शतकांच्या जुन्या जखमा आज भरल्या…”

    November 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.