Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काका पुतण्यासाठी पोळा ठरला शेवटचा दिवस
    क्राईम

    काका पुतण्यासाठी पोळा ठरला शेवटचा दिवस

    editor deskBy editor deskAugust 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था

    राज्यात आज बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे. सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात काका पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय-१८) अशी मृताची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
    वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांचा पूजनाचा दिवस म्हणजे बैलपोळा. या सणाची शेतकरी वर्गात आठ दिवसांपूर्वी पासूनच लगबग सुरु असते. पंढरीनाथ यांनी देखील पोळा असल्याने त्यांचे दोन्ही बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावात आणले होते. मदतीला पुतण्या रितेशला सोबत आणले होते. तलावच्या काठावर दोन्ही काका पुतणे बैलांना धुत होते.
    दरम्यान त्यातील एका बैलाने त्यांना जोराचा धक्का दिला. जोरदार धक्क्याने पंढरीनाथ यांच्या हातातील बैलांची दोरी सुटली आणी ते तलावच्या पाण्यात पडले. काका बुडत असल्याचे पाहून पुतण्या रितेशने देखील वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.मात्र दोघेही पाण्यात बुडाले.ही बाबा कळतच इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून दोन्ही काका पुतण्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.