
भडगाव : प्रतिनिधी
स्थानिक पत्रकारांच्या प्रसंगावधानामुळे भडगावात शालेय पोषण आहाराचा संशयास्पद तांदूळ घेऊन जाणारी गाडी पकडण्यात यश आले आहे. या धडक कारवाईत भारत बेन्झ कंपनीची ट्रक (एमएच ५२, ०१३८) भडगाव – पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या गाडीत ‘विनायक फूड’ असे छापील लेबल असलेल्या सुमारे ३०० तांदळाच्या र गोणी आढळल्या आहेत.
ही ट्रक चाळीसगावहून भडगाव मार्गे पाचोऱ्याकडे जात असताना पत्रकारांना न त्यातील साहित्याबाबत संशय आला. वे चाळीसगाव रस्त्यावरील एका पेट्रोल न पंपाजवळ त्यांनी गाडी थांबवण्याचा द प्रयत्न केला. परंतु, चालकाने गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी तत्काळ महसूल व पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. दरम्यान, तहसीलदार शीतल सोलट न यांच्या आदेशाने प्रभारी पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार रमेश देवकर पुरवठा निरीक्षक सुनील सोनवणे, लिपिक हर्षल भदाणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तर ट्रक भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. यामुळे मात्र अवैध धान्य साठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या चालकाकडे रोहित ट्रेडिंग कंपनीची बिले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ही बिले खरी की बनावट, याची तपासणी महसूल विभाग करत आहे. तर, तीन दिवस उलटूनही बिल पावत्यांची सत्यता पळताळणी झाली नाही. तहसीलदार शीतल सोलट यांच्या आदेशानुसार गाडीतील मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर व मालाची खरी ओळख पटल्यानंतर संबंधित गाडीचालक व संबंधितांवर गुन्हा दाखल होतील, असे सांगितले जात आहे.गत तीन दिवसांपासून तहसील कार्यालयात उभी असलेली तांदळाची ट्रक नेमकी कुणाची? तो तांदूळ रेशनचा की शालेय पोषण आहाराचा? याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही. हा साठा शालेय पोषण आहाराचा असावा असा प्राथमिक अंदाज बांधून तहसील प्रशासनाने भडगावच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. तसेच, ही तांदळाची गाडी ताब्यात घेण्याबाबत त्यांना सूचित केले होते.
भडगावच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ही गाडी ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवल्याने या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तांदूळ नक्की कोणाचा ? तो कोठून कुठे नेला जात होता? याचा गुंता वाढला आहे. तर तीन दिवसांपासून तहसील आवारात पडलेल्या गाडीवरुन प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता मनमाड पुरवठा विभागाच्या अहवालानंतरच तांदळाच्या काळ्याबाजारामागील सत्य बाहेर येण्याची शक्यता असल्याची चर्चा तहसील आवारात सुरु आहे.



