Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद
    क्राईम

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    editor deskBy editor deskJune 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी सकाळी आसाममधील जोरहाट येथील रौरिया एअरबेसवर भीषण अपघात झाला. विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना ते कोसळून त्याला आग लागली. या दुर्घटनेत वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला असून एक सह-वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे हवाई दलासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त AN-32 विमान नियमित उड्डाणावर होते. रौरिया एअरबेसवर लँडिंग करत असताना अचानक विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीजवळ कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागून त्याचे दोन तुकडे झाले. घटनास्थळी बचाव पथक आणि अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली.

    या अपघातात स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा मृत्यू झाला. तर सह-वैमानिक जखमी झाला असून त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, विमान नियमित प्रशिक्षण व वाहतूक मोहिमेवर होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक निष्कर्ष समोर येईपर्यंत कोणतेही तर्क-वितर्क करू नयेत, असे आवाहनही हवाई दलाने केले आहे.

    दरम्यान, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला, याचा तपास चौकशी समितीकडून केला जाणार आहे.

    AN-32 हे सोव्हिएत संघात विकसित करण्यात आलेले मध्यम क्षमतेचे लष्करी मालवाहू विमान आहे. भारतीय हवाई दलाने 1980 च्या दशकात ही विमाने ताफ्यात दाखल केली होती. उष्ण हवामान, डोंगराळ प्रदेश आणि हिमालयासारख्या उंच भागात उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे AN-32 ला हवाई दलाच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा मानले जाते. भारतीय हवाई दलाने सुरुवातीला 125 AN-32 विमाने खरेदी केली होती. त्यापैकी सध्या सुमारे 100 विमाने सक्रिय सेवेत आहेत. सैनिक, लष्करी साहित्य, रसद आणि आपत्कालीन मदत सामग्री वाहून नेण्यासाठी या विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

    या दुर्घटनेनंतर AN-32 विमानांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून चौकशी अहवालानंतरच अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृत जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026

    लकीबा नगरात गूढ मृत्यू; झाडाला लटकलेल्या तरुणाच्या मृतदेहाने खळबळ

    June 13, 2026

    गुटखा माफियांवर आता मकोकाचा बडगा; तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.