Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
    जळगाव

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    editor deskBy editor deskMarch 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आंबेडकर स्मारक ते मरीमाता मंदिर मार्ग होणार सुकर; विद्यार्थ्यांसह भाविकांना दिलासा

    धरणगाव : प्रतीनीधी

    धरणगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मरीमाता मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी आता पूर्ण होत असल्याने मोरया परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

    या रस्त्याच्या अभावामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः बालकवी ठोंबरे शाळा, रेल्वे स्टेशन, स्वामी समर्थ केंद्र आणि चिंतामण मोरया मंदिराकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता काँक्रीट रस्ता झाल्यामुळे या सर्व समस्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे.

    तसेच, धरणगावातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या गर्दीत एसटी महामंडळाच्या बसना मार्ग काढताना अडथळे येत होते. नवीन रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

    या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील तसेच रस्त्याच्या कामात विशेष लक्ष घालणारे युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.

    एकूणच, या रस्त्याच्या कामामुळे धरणगाव शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात

    March 23, 2026

    पाचशे रुपयांसाठी रक्तरंजित हल्ला; जळगावात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    March 23, 2026

    भरधाव कंटेनरची भीषण धडक; प्रतिष्ठित शेतकरी जागीच ठार

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.