पारोळा : प्रतिनिधी
अतिवृष्टी व सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील चोरवड येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २१ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सतत होणारी नापिकी, कमी- अधिक पाऊस व शेतीमालाला भाव येत नसल्याने व कर्जाचा डोंगर डोक्यावर चढत असल्याने तालुक्यातील चोरवड येथील शेतकरी वाल्मीक अजबराव पाटील (वय ४५) यांनी १८ रोजी आपल्या स्वतःच्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना तत्काळ नातेवाईकांनी धुळे जिल्ह रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
दरम्यान, २१ रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मलावली. याबाबत धुळे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, वाल्मीक पाटील यांच्यावर सेंट्रल बँकेचे २ लाखांचे पीक कर्ज होते. त्यांच्य पश्चात आई, वडील, पत्नी व २ मुले असा परिवार आहे.



