Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’
    क्राईम

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    editor deskBy editor deskDecember 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील अनेक दावे करीत असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत आहेत. माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. असे असतानाही जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही? असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे दिली जात नसल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

    सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक मनोहर वाडेकर यांना मातृशोक झाल्याने, त्यांचे सांत्वन करण्यासाठी जरांगे पाटील पुण्याच्या चाकणमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे गंभीर आरोप केले.

    आपल्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल बोलताना जरांगे म्हणाले, मी सरकारचे पोलिस संरक्षण नाकारले आहे. माझ्यासोबत दिसणाऱ्या पोलिसाला चालताना धाप लागते. मात्र, मला संपवण्याचा कट रचला जात आहे. पकडलेल्या आरोपींनी कबुली दिली नसती, तर गोष्ट वेगळी होती. पण त्यांनी नाव घेतले आहे. नार्को टेस्टची मागणी करणारे आता कुठे गेले? त्यांनी पुढे येऊन आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करावी. या प्रकरणाचे पुढच्या काळात वाईट पडसाद उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला.

    पुन्हा आंदोलनाचा पवित्रा मराठा आरक्षणाबाबत बोलताना जरांगे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी असूनही अधिकारी जाणूनबुजून मराठा बांधवांना प्रमाणपत्र देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही शांत आहोत, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी एकही प्रमाणपत्र थांबणार नाही आणि शिंदे समिती सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची आम्ही वाट पाहत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पनवेलमध्ये उभारलेल्या मराठा भवन उपक्रमाचे कौतुक करत राज्यभर असे उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली.

    सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरही जरांगे यांनी सडकून टीका केली. अधिवेशनात दोन दिवस त्यांच्यातील लफडे आणि गोंधळातच जातील. हे सगळे मिळून शेतकऱ्यांचे वाटोळे करणार आहेत. कर्जमाफी करायची असेल तर नुसत्या गप्पा नकोत, थेट आदेश द्या. हे सत्ताधारी आणि विरोधक सगळेच ‘चाभरे’ आहेत, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. हैदराबाद गॅझेट मिळून तीन महिने झाले तरी समिती स्थापन झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दावर अजूनही विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.