Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : तेलंगणाहून निघाले जळगाव येण्यासाठी रस्त्यात दाम्पत्य बेपत्ता !
    क्राईम

    खळबळजनक : तेलंगणाहून निघाले जळगाव येण्यासाठी रस्त्यात दाम्पत्य बेपत्ता !

    editor deskBy editor deskNovember 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था 

    तेलंगणा राज्यातून लग्न सोहळ्यासाठी जळगावकडे निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या दाम्पत्याचा अखेरचा मोबाईल लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावाजवळ आढळल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त करत कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गावात भीतीचं वातावरण आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहेत. पद्मसिंह पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कारने पाचोरा (जळगाव) येथे लग्न सोहळ्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी निघाले होते.  मात्र, ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाहीत आणि घरीही परतले नाहीत. अनेक तास संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचे सर्व प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले. त्यानंतर मोबाईल लोकेशन तपासल्यावर दाम्पत्याचे शेवटचे ठिकाण खामगाव–मलकापूर महामार्गावरील वडनेर गावाजवळ असल्याचे दिसून आले.

    दाम्पत्याचा संपर्क यानंतर पूर्णपणे तुटला. परिणामी नातेवाईकांनी नांदुरा पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात करत विशेष पथक तयार केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही घटना घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वडनेर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून माहिती, तसेच वाहनाचा मागोवा घेण्याचे काम सुरू केले आहे. या गूढ बेपत्ता प्रकरणामुळे पद्मसिंह यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.