Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २०२९ च्या निवडणुकीत आठवणीनं ‘त्यांना’ पाडा ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !
    राजकारण

    २०२९ च्या निवडणुकीत आठवणीनं ‘त्यांना’ पाडा ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !

    editor deskBy editor deskOctober 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आज ( दि. ८ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारांनंतर ते आता अंकुश नगर येथील त्यांच्या घरी परतणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शेतीबरोबरच मराठ्यांनी नोकरी आणि शिक्षणाकडंही लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं. तसंच ओबीसी नेत्यांवर टीका करताना त्यांनी ज्या ज्या नेत्यानं मराठा आरक्षणला विरोध केला त्यांना २०२९ च्या निवडणुकीत आठवणीनं पाडा असं देखील सांगितलं.

    मराठा समाजाला उच्चशिक्षण आणि मोठ्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. “शेतीवर मोठमोठी संकटं येतात आणि शेती उद्ध्वस्त होते. इतर समाजातील लोकांना शेती आणि नोकरी असे दुहेरी आधार आहेत, पण मराठा शेतकऱ्याला आधार नाहीये,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागू न देता ते ताकदीने टिकवले पाहिजे आणि राहिलेल्या मराठ्यांना देखील आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतीला नोकरी आणि शिक्षणाची जोड गरजेची आहे, असेही ते म्हणाले.

    आरक्षणाविरोधात गेलेल्या नेत्यांना जरांगे पाटलांनी २०२९ च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा दिला. “२०२९ ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना आठवणीने पाडायचं,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी मराठा समाजाला दिले. आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलेल्या लेकरांच्या सुसाईड नोट बनावट असल्याचा काही पोलीस अधिकाऱ्यांचा दावा असल्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “एखाद्याच्या भावनेशी खेळायचं… तुमच्या घरात लेकरू मेल्यावर, जो तपास करतो त्याच्या घरातील लेकरू असलं तर… लोकांच्या जीवनाशी तर खेळू नका,” अशा शब्दांत त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.