Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !
    राजकारण

    मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !

    editor deskBy editor deskJuly 12, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही आपली प्रमुख मागणी आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्ष संधी दिली, आता सरकारला संधी द्यायची नाही असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तालुक्यातील धारासूर येथे गुरुवारी सायंकाळी उशिरा चावडी बैठकी निमित्त मनोज जरांगे पाटील हे आले असताना चावडी बैठकीचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते.

    श्रीमंत मराठ्यांनी राजकारण जरूर करावे, पण त्याअगोदर आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आज आरक्षणाअभावी मराठा युवक सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत आहेत. आरक्षणासाठीची एकजूट फुटू द्यायची नाही, अशी साद घालत एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही असा शब्द उपस्थित जनसमुदायाला जरांगे पाटील यांनी दिला.

    सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटायचे नाही. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांचे प्रमाणपत्र रोखून धरल्या जात असल्याची माहिती आपल्याला समजली असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यात खोडा घालत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. आपण कुणावर खोटे आरोप करत नाही, परंतु मराठा समाजाला वेठीस धराल तर गाठ माझ्याशी आहे.

    मी कचाट्यात आल्यावर सोडत नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मराठा समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले, कृष्णा भोसले, प्रताप कदम, अतुल जाधव, राजाभाऊ कदम, राजाभाऊ खोडवे, प्रकाश खंटिंग, संतोष बोबडे, बाळु बेद्रे, दगडू जाधव, लक्ष्मण कदम, कुलदीप जाधव, गणेश कदम, विष्णू कदम, अशोक कदम, राजाभाऊ डिळेकर, निखील कदम यांच्यासह धारासूर परिसरातील हजारो मराठा बांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्याना कुणबी प्रमाणापत्र द्या, परंतु ते वेळेवर देऊ नका. प्रमाणपत्र दिलेच तर त्या प्रमाणपत्राची वैधता होऊ देऊ नका. सामाजिक न्याय खाते माझ्याकडेच असून कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ज्या मराठा समाजाने संजय शिरसाठ यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तेच शिरसाठ मराठ्यांच्या ताटात विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.