Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनसेंने दिली अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी !
    राजकारण

    मनसेंने दिली अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी !

    editor deskBy editor deskMarch 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील मुंबई महापालिकापूर्वीच सर्वच पक्षातील नेत्यांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच मनसेच्या मुंबई अध्यक्ष पदाची घोषणा केली. संदीप देशपांडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पक्षाची केंद्रीय समितीही जाहीर केली.

    राज ठाकरे यांनी संघटनेत पहिल्यांदाच एवढे मोठे बदल केले आहेत. केंद्रीय समितीची जबाबदारी नितिन सरदेसाई यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत नवीन पदांची रचना केली आहे. मनसेचे नते बाळा नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय गट अध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या केंद्रीय समितीचे नेतृत्व नितीन सरदेसाई करणार आहेत. मुंबई मनसे गटाध्यक्ष केंद्रीय समिती मध्ये बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गटाध्यक्ष महत्वाचा भाग आहे. त्यामुळे नांदगावकर, अभ्यंकर या अनुभवी नेत्यांवर राज ठाकरेंनी ही जबाबदारी सोपवली आहे.

    केंद्रीय समिती आम्ही नेमली आहे. केंद्रीय समिती प्रत्येक घटकांकडे लक्ष देतील. मुंबई शहर अध्यक्ष आम्ही निवडला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही रचना लावण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मला जे बोलायचे ते मी बोलेन. ज्याला जे काम दिले आहे, त्यांनी ते जबाबदारीने करावे, अशा सुचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

    मुंबई अध्यक्षपदी निवडीनंतर संदीप देशपांडे म्हणाले की, पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली आहे. राज ठाकरे यांनी खूप मोठा विश्वास दाखविला आहे. आजपासून मनसेचे मिशन मुंबई महापालिका सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणूक जोरात लढवली जाईल. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणले जातील. मुंबई महापालिकेत निश्चित बदल दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.