Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री मोठा अनर्थ घडला : पाच मजुरांचा मृत्यू, वाळूखाळी दबल्याने जीव गेला
    क्राईम

    मध्यरात्री मोठा अनर्थ घडला : पाच मजुरांचा मृत्यू, वाळूखाळी दबल्याने जीव गेला

    editor deskBy editor deskFebruary 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : वृत्तसंस्था

    राज्यातील जालना येथे मजुराच्या पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता दुर्दैवी घटना घडली. महिला आणि १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले, पण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी – चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे मजूर होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना घडली. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

    जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याचं शेड बांधून राहत होते. मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू खाली केली. त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.