Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शरद पवारांचे विधान : दोन्ही पवार एकत्र येणार ?
    राजकारण

    शरद पवारांचे विधान : दोन्ही पवार एकत्र येणार ?

    editor deskBy editor deskJanuary 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्याच्या राजकारणात कालपासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.

    शरद पवार म्हणाले कि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तर या संदर्भात सामंजस्याने प्रश्न सुटावा असे आमच्या नेत्यांचे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत शरद पवार यांनी यांदी दिले आहेत. इतकेच नाही तर अजित पवार यांच्याशी केवळ एका प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे. आमच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून दोन्ही पवार एकत्र येणार असल्याची शक्यता शरद पवार यांनी फेटाळली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात शरद पवार आणि अजित पवार यांची काल बंद दाराआड चर्चा झाल्याने याबाबत तर्क लावले जात होते. मात्र ही शक्यताच शरद पवार यांनी फेटाळून लावली. अजित पवार यांच्यासोबत आमची केवळ एका प्रकल्पावर चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि मी अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहोत. त्यामुळे आमच्यात त्या संदर्भात चर्चा झाली असल्याचे देखील ते म्हणाले.

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव ठाकरे यांचे मत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याबाबतही त्यांनी भाष्य केले. दोन्ही मेळाव्यांची तुलना केली तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला जास्त उपस्थिती होती. असे दिसत असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.