Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » …हे काय तुमचे घर नाही ; सरकारवर खा.सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल !
    राजकारण

    …हे काय तुमचे घर नाही ; सरकारवर खा.सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल !

    editor deskBy editor deskJanuary 21, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    महायुतीमध्ये गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आता महायुती सरकारवर टीकास्त्र सोडू लागले असतांना आता पवार गटाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
    खासदार सुप्रिया सुळे म्हणाले कि, पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही, तुम्हाला जनतेची कामे करून करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

    विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी बराच कालावधी गेला. त्यात पालकमंत्र्यांची नावे देखील उशिरा जाहीर झाली. यामुळे महायुतीत नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. आधी मंत्रीपदाचे खाते वाटप आणि नंतर पालकमंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीमधील नेत्यांचा वाद समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.

    राज्य सरकारने आता कामाला लागायला हवे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. किती गंभीर प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर आणि जनतेसमोर आहेत. यावर राज्य सरकार चर्चाच करत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. लोकांनी आपसात भांडण करण्यासाठी निवडून दिलेले नाही. तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी निवडून दिले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कोण कुठला पालकमंत्री? कोणता विभाग कोणाला मिळाला? ही काय घरची स्टोरी नाही. ही देशाची आणि राज्याची सेवा असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

    राज्यातील जनतेचा गंभीरतेने विचार करा, असे म्हटणत सुप्रिया सुळे यांनी हात जोडून राज्य सरकारला शालजोडे मारले. पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे तुमचे घर नाही, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या माध्यमातून सुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे हे त्यांच्या मुळ गावी गेले असून पालकमंत्री पदांवर नाराजी असल्यामुळेच ते रुसले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.