Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ मध्ये कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !
    क्राईम

    भुसावळ मध्ये कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

    editor deskBy editor deskAugust 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी नदी जवळ असलेल्या सर्वे क्रमांक ७८ ब मधिल साईचंद्र नगरात रविवार २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या स्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी इतर घरांना तडे गेल्या नाहीत ना याची खात्री करून घेतली. इमारत पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून सर्व नियमाप्रमाणे बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र मिळते. ते एनओसी या बिल्डरने घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

    भुसावळ शहरात अजुन किती जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या, त्यानुसार नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे , मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उप मुख्याधिकारी लोकेश ढाके, परवेश शेख उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाला तीन महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यात या सर्व भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, त्यासंदर्भात कार्यवाही सुरु करण्यात आली आली आहे. इथल्या मातीचे परीक्षण करून घेण्यास सांगितले, त्याप्रमाणे संबंधितांना पत्र पाठवण्याची कार्यवाही सुरु आहे. ही इमारत बांधणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाला नोटीस पाठवावी असे सांगितले होते. त्यासंदर्भात आजच नगरपालिकेने बांधकाम व्यवसायिकाला नोटीस दिली असल्याचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले.
    या भागात कलम 163 लागू केले आहे. अजून तिथले तीन घरे पडण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या लोकांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.