Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पावसाने कोसळली घराची भिंत, मदतीला पोहचला प्रहारचा हात
    जळगाव

    पावसाने कोसळली घराची भिंत, मदतीला पोहचला प्रहारचा हात

    editor deskBy editor deskAugust 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पाऊस सुरु आहे. यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील एका घराची भिंत कोसळली. दैव बलवत्तर असल्याने कुटुंबातील सर्व बचावले मात्र काही सदस्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी हे त्याठिकाणी पोहचले. कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांनी उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य आणि काही आर्थिक मदत दिली.

    यावल तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगवी बु. गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणाऱ्या बाळू भगवान सोनवणे यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी कुटुंबातील काही सदस्यांना किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह धीरज अनिल चौधरी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सोमवारी सकाळीच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी संकटग्रस्त कुटुंबाची भेट घेतली.

    पावसाळ्याच्या दिवसात संसार उघड्यावर आल्याने कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू होते. कुटुंबाला आधार देत अनिल चौधरी यांनी कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य आणि आर्थिक मदत देऊन त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि विभागाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेने घरांची आवश्यकता असल्यास डागडुजी करून घ्यावी, असे आवाहन अनिल चौधरी यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाविकास आघाडी फुटली : कॉँग्रेस लढणार स्वबळावर !

    November 16, 2025

    विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या; खान्देशात घडली धक्कादायक घटना !

    November 16, 2025

    महिलांनी केले अश्लील हावभाव : चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !

    November 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.