Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !
    क्राईम

    बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

    editor deskBy editor deskOctober 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

     

    बिहारच्या बक्सर जिल्ह्यात बुधवारी ११ ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भयानक अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ७० प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, या अपघाताबाबत लोको पायलटने एक खळबळजनक खुलासा केला आहे.

     

    दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन रुळावरून घसरण्यापूर्वी लोको पायलटला एक मोठा आवाज आला. त्यामुळे लोको पायलटने अचानक ब्रेक दाबले. मात्र, काही कळण्याच्या आतच ट्रेनचे २१ डबे रुळावरुन घसरले. गेटमनने देखील या आवाजाची पुष्टी केली आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात? असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे ट्रेनचे गार्ड विजय कुमार यांनी देखील थरकाप उडवणाऱ्या या घटनेबाबत माहिती सांगितली. विजय म्हणाले, ट्रेन सामान्य वेगाने धावत होती. मी बसून माझे काही पेपरवर्क करत होतो. तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. लोको पायलटने ब्रेक लावताच ट्रेन रुळावरुन घसरली. त्यानंतर मोठा धक्का बसला. मी त्याच क्षणी बेशुद्ध झालो, असं विजय सांनी सांगितलं आहे. पाच मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर मी डोळ्यांवर पाणी शिंपडले. अपघाताच्या आधी झालेला आवाज कशाचा होता? लोको पायलटने अचानक ब्रेक का मारला ते कळलं नाही. असंही विजय कुमार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ७० प्रवासी जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंद्र कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “घटनेचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १०-१० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

    #accident railway
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.