Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परप्रांतीय तरुण भरधाव रेल्वेत करायचे असे काही कि पोलिसांना बसला धक्का !
    क्राईम

    परप्रांतीय तरुण भरधाव रेल्वेत करायचे असे काही कि पोलिसांना बसला धक्का !

    editor deskBy editor deskAugust 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी मुंबई : वृत्तसंस्था

     

    भरधाव रेल्वेतून फेरीवाला बनून प्रवाशांचे महागडे मोबाईल पर्स आणि दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंबई रेल्वे एसटीएफ पथकाने अटक केली आहे. रामेश्वर साहनी, खूबलाल महतो, विनोद महतो अशी या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 17 मोबाईल, महागडी घड्याळं यासह जवळपास 9 लाखाचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. एका महिला प्रवाशाची लूट केल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत टोळीचा शोध सुरु केला. अखेर या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    मेल एक्सप्रेसमध्ये एसीच्या डब्यात प्रवाशांचे किंमती वस्तू चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे. पूर्णिमा बेन शर्मा या महिला 13 एप्रिल रोजी एर्नाकुल्लम निजामउद्दीन या एक्सप्रेस प्रवास करीत होत्या. प्रवासात त्या वाशरूममध्ये गेल्या तेव्हा त्यांची पर्स सीटवर होती. त्या परत आल्या तर त्यांची पर्स त्या जागेवरून गायब होती. त्यांच्या पर्समध्ये मोबाईल, एटीएम कार्ड आणि दागिने होते. या प्रकरणी त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश चिंचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरशूद्दीन शेख, हेमराज साठे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे विशेष पथक बनवत तपास सुरु केला. अखेर तपास करत महिलेचा चोरीस गेलेले एक एटीएम कार्ड वापरण्यात आल्याने त्यातील व्यवहारामुळे पोलिसांना सुगावा लागला आणि गुप्त महितीदार आणि तांत्रिक बाबी तपासून पोलिसांनी रत्नागिरीहून तीन जणांना अटक केली. तिन्ही आरोपी परप्रांतीय असून, गाडीत फेरीवाला बनून प्रवास करायचे. संधी साधून प्रवाशांच्या किंमती वस्तू चोरायचे. या तिघांकडून 8 लाख 58 हजार 288 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 4 लाख 50 हजार रुपयांचे दागिने, महागडे घड्याळ, 17 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Crime Mumbai railway
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.