Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एटीएममध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, आरबीआयचा नवा नियम
    राज्य

    एटीएममध्ये कॅश नसल्यास बँकांना होणार १० हजारांचा दंड, आरबीआयचा नवा नियम

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- एटीएममध्ये पैसै नसल्याने अनेकदा ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या त्रासापासून आता ग्राहकांची मुक्ती होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करत एटीएममध्ये पैसे नसलेल्या संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असे स्पष्ट केले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले.

    आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये वेळोवेळी पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास बँकांवर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली जाईल. एटीएममध्ये कॅश उपलब्धतेबाबत आरबीआयने सर्व बँक अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचाकल आणि सीईओंना लक्ष ठेवण्यासाठी सुचना दिल्या आहेत. आरबीआयने नवीन आदेशात म्हटले की, एटीएम मशीनमध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे बँका, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) एटीएममध्ये कॅश उपलब्धतेवर लक्ष ठेवावे तसेच वेळोवेळी कॅश फिल करण्यासाठी त्यांच्या यंत्रणा अधिक सक्षम कराव्यात. एटीएममध्ये किती आहे. याचे योग्य नियोजन करत वेळे मिळताच पुन्हा एटीएममध्ये पैसे टाकावेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही.

    आरबीआयने यासाठी ‘Scheme of Penalty for non-replenishment of ATMs’ या नियमाची घोषणा केली आहे. या नियमानुसार एटीएममध्ये दहा तासांहून अधिक काळासाठी कॅश नसल्यास हा नियम लागू करण्यात येणार आहे.व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्यूएलए) म्हणजेच प्रायव्हेट एटीएमच्या प्रकरणातही हा दंड आकारला जाईल. असेही आरबीआयने स्पष्ट केलं. बँकांना कॅश संदर्भातील व्यवस्थापन आणि कॅश फिलिंग सिस्टम मजबूत करण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचा थरार : पोस्टरबाजीने चिघळला राजकीय संघर्ष !

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.