जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोहुरखेडा फाट्यावर दोन तरूण भरधाव वेगात मोटरसायकल चालवून पुलाच्या भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने एक तरुण जागीच ठार तर दुसरा उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना दुपारी घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी सूरज याच्या भावाचा मृत्यू झाला होता. भावाच्या वर्षश्राद्धालाचा दुसऱ्या भावाच्या नवआयुष्यावर संक्रांत आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सुरज रामदास तांबे (वय 15, रा.काहुरखेडा), सुनिल विठ्ठल भालेराव (वय 20, रा. वघारी ता. जामनेर) हे दोघे तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्र. एमएच 19 डी 1600 वरुन काहुरखेडा फाट्यावर भरधाव वेगात मोटरसायकल चालवत असतांना महामार्गावरील भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने सुरज यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने हा जागीच ठार झाला तर सुनिल याच्या मानेला जबर मार लागल्याने याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत वरणगाव पोलिसात पो.पा. साहेबराव शांताराम पाटील यांच्या खबरदारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पीएसआय किशोर पाटील, हे.काँ. विजू बावीस्कर करीत आहे.