Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राहुल गांधींना मनसेने दिली राष्ट्रीय ‘पप्पू’ ची उपमा !
    क्राईम

    राहुल गांधींना मनसेने दिली राष्ट्रीय ‘पप्पू’ ची उपमा !

    editor deskBy editor deskNovember 17, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राज्यातून टिकेचे पडसाद उमटत आहेत. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘राष्ट्रीय पप्पू’ असे राहुल यांना संबोधत त्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे.’ अशी टिका त्यांनी केली आहे.

    राज्यातील भारत जोडो यात्रे दरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

    राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केल्यानंतर आता मनसे पक्षाने देखील काँग्रेस नेते राहुल यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत राहुल यांना राष्ट्रीय पप्पू अशी उपमा देऊ केली आहे. सावरकरांचा अपमान हा संपूर्ण भारताचा हा अपमानआहे.

    पण राष्ट्रीय पप्पू प सावरकर नावाची महती समजेल हे अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे आमदार पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.भारत जोडो यात्रेवर देखील त्यांनी तोफ डागली असून ‘भारत जोडो’ हे दाखवायचे दात आणि द्वेष पसरवणारे खरे दात यातला फरक स्पष्ट आहे असे आमदारांनी म्हटले आहे.

    काय आहे ट्विट
    केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा अपमान आहे. पण ‘राष्ट्रीय पप्पू’ला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची महती समजेल याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. ‘भारत जोडो’ हे दाखवायचे दात आणि द्वेष पसरवणारे खरे दात यातला फरक स्पष्ट आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.