Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महापालिका यशानंतर भाजप आक्रमक; गोरे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस संतप्त
    राजकारण

    महापालिका यशानंतर भाजप आक्रमक; गोरे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस संतप्त

    editor deskBy editor deskJanuary 20, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था

    राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरल्याने सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.

    महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहीत “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं… पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे विधान केले होते. या वक्तव्यावर टीका करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी “दो कदम पीछे नहीं हटे… ५० कदम नीचे गिरे हैं, वह भी टांग ऊपर” अशा आक्षेपार्ह शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

    या पार्श्वभूमीवर आगामी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर भाजप–काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा देत भाजपकडून निवडणूक तयारीला वेग आला आहे.

    जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असून, भाजपकडूनही संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. बैठका, रणनीती आखणे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यावर भाजपचा भर असल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही यश मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यासाठी राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालल्याचे स्पष्ट चित्र आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.