जळगाव : प्रतिनिधी
तुम्ही दोन्ही बाप लेक जास्त मातले आहे, असे म्हणत प्रौढाच्या अंगावर रिक्षा घेवून जात त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच शहरात कुठेही दिसले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना दि. २० रोजी कोंबडी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात दगडू सिताराम पाटील हे प्रौढ वास्तव्यास असून ते हमाली काम करतात. ते दि २० सप्टेंबर रोजी काम शोधण्यासाठी दाणाबाजारात गेले होते. सायंकाळपर्यंत त्यांना काम न मिळाल्याने ते कोंबडी बाजार परिसरात उभे होते. त्यावेळी सागर रमेश बेहरे हा त्याची (एमएच १९, व्ही ८८०५) क्रमांकाची रिक्षा घेवून त्यांच्या अंगावर घेवून गेला. तसेच रिक्षातून उतरवून दगडू पाटील यांचा रस्ता अडवून त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.