Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वीजेचा शॉक लागून ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
    क्राईम

    वीजेचा शॉक लागून ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चंद्रपूर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे तर नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतात पडलेल्या जिवंत वीजवाहक तारांचा स्पर्श झाल्यामुळे 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) गावात घडली आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर (मेंडकी) येथील काही शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतात काम करत होते. काम करताना सकाळी 11 च्या सुमारास त्यांचा स्पर्श जिवंत वीजवाहक तारांना झाला. त्यात 4 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 2 शेतकरी गंभीर जखमी झाले. जखमींवर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत अशी या घटनेत बळी गेलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. मृतांपैकी 3 शेतकरी गणेशपूरचे आहेत, तर एक शेतकरी चिचखेडचा रहिवासी आहे.

    ही घटना रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या वीजवाहक तारांमुळे घडली किंवा काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस त्या अंगानेही या घटनेची चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत वाहक तारा शेतात पडल्या होत्या. त्या तशाच राहिल्यामुळे ही दुर्घटना घडली असा दावाही या प्रकरणी केला जात आहे. पण वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश दिलेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.