जळगाव : प्रतिनिधी
भरधाव रिक्षा-दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघात झाल्याची घटना बुधवार दि. ६ रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जैन कंपनीसमोर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांवरील ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून प्रवाशी रिक्षा भरून जळगाव शहराकडे निघाली असतांना जैन कंपनीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप रामचंद्र पाटील (वय २८ रा. गढोदा ता. जळगाव), रिक्षा चालक दिपक भाई (वय ३३ रा. पाळधी ता. धरणगाव), प्रवाशी भगवानसिंह राजपूत (वय ४२ रा. जळगाव), विजय नामदेव महाजन (वय ३६ रा. पाळधी ता. धरणगाव) आणि देवीदास विनायक चौधरी (वय ३५ रा. झुरखेडा ता.धरणगाव) असे एकुण ५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे