महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याच्या वतीने
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विशेषांक प्रकाशन समारंभ अॅड.एस.ए.बाहेती महाविद्यालय जळगाव येथे पार पडला, त्या प्रसंगी डॉ.मिलींद बागुल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.अनिल लोहार हे होते.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिरीष चौधरी व कल्पना चौधरी यांनी केले.
डॉ.मिलींद बागुल यांनी श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य आपल्या संविधानात आहे पण सध्या स्वैराचार पहायला मिळते आणि सोबतच कायद्याचा आदर करण्याचा आग्रह केला.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका ही समाजाची किड दुरुस्त करण्याचे काम करीत आहे असेही सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अनिल लोहार यांनी श्रद्धा, अंधश्रद्धा व विश्वास समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव व वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासले पाहिजे आणि हे सर्व विवेक जागृत ठेवून शक्य आहे असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालन सुरेश थोरात यांनी केले. प्रा.दिलिप भारंबे यांनी अंधश्रद्धेचा अंधार हटवण्यासाठी अंनिप महत्वाची भूमिका बजावत आहे.
प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी केले.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रीका विशेषांकासाठी घेतलेल्या हितचिंतकांचे आभार मानून अंक यशस्वीतेसाठी घेतलेल्या परिश्रमाविषयी आढावा दिला. समारोप व आभार जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी केले.