जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरात नांदायला येत नाही म्हणून पती-पत्नीत वाद होऊन पती अजिता हमीद तडवी (३१, रा. तांबापुरा) याने पत्नी शहनाज तडवी (२२, रा. तांबापुरा) यांना मारहाण करीत मानेवर विळ्याने वार केला. ही घटना १२ जानेवारी रोजी हरिविठ्ठलनगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तडवी दाम्पत्यामध्ये वाद असल्याने पत्नी शहनाज या माहेरी निघून गेल्या- त्यांना घेण्यासाठी अजित तडवी गेला असता, तेथे वाद झाला. त्यावेळी तुम्ही दारू सोडली व कामधंदा केला तर मी सोबत येईल, असे सांगितले. त्याचे वाईट वाटून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच विळ्याने मानेवर वार करून जखमी केले व तृ माझ्यासोबत नांदायला आली नाही तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली- याप्रकरणी शहनाज तडवी यांनी रामानंदनगर पोलिसात फिर्याद दिली.