• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवारांना माहित होत शिवसेना फुटणार : अजित पवार !

editor desk by editor desk
February 3, 2023
in राजकारण, राज्य
0
शरद पवारांना माहित होत शिवसेना फुटणार : अजित पवार !

मुंबई : वृत्तसंस्था 

शिवसेनेतून तब्बल एक दोन नव्हे तर ४० आमदार एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात बाहेर पडले त्यावर मोठे राजकारण अवघे देशाने पाहिले आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाने नंतर राज्यात सत्ताही स्थापन केली. शिवसेनेच्या या बंडावर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. तसेच गफलत कुठे झाली याची माहितीही दिली आहे.

पुण्यात एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार का फुटले? याची माहिती दिली. आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली, असं अजित पवार म्हणाले.

या सगळ्या गोष्टी घडू दिल्या गेल्या… आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं… तिकडे हे व्हायला नको होतं… मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं. पण ते बोलले की मी बोलन एकनाथ शिंदेंशी. तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे असं उत्तर त्यांनी दिलं, असंही त्यांनी सांगितलं. लोकशाहीत तोडाफोडीचं राजकारण फार काळ चालत नाही. लोक नक्कीच धडा शिकवतील. तिकडे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगही नुसत्याच तारखावर तारखा देतंय. खरंतर तिकडून न्याय मिळाला पाहिजे, असंही ते म्हणाले. विधान परिषदेच्या निकालाने सत्ताधाऱ्यांना जबरदस्त धक्का दिलाय. हा निकाल म्हणजे सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा म्हणता येईल. दुसरीकडे सत्यजीतला काँग्रेसने उमेदवारी दिली असती तर हे घडलं नसतं. विशेष म्हणजे शिक्षक वर्गाने हा निकाल दिलाय. तिकडे कोकणातही भाजपने मूळ शिवसेनेचाच उमेदवार तिकडे नेला होता म्हणूनच तेवढी जागा भाजप जिंकू शकलंय. आम्ही तिथे कमी पडलोय हे खरं आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.

Tags: #ajitpawar
Previous Post

डमी मालक दाखवीत प्लॉट विक्री करणारी टोळी अटकेत !

Next Post

वेटरनेच फोडले हॉटेल ; धरणगावात गुन्हा दाखल

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

वेटरनेच फोडले हॉटेल ; धरणगावात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group