जळगाव प्रतिनिधी: शहरातील अतिक्रमण असो हॉकर्सबाबत मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सिंघम म्हणूम ओळख निर्माण झाली होती त्याची मुबई येथे उपसंचालक पदी बदली झाली आहे.महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील राज्यातील ६ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांचाही समावेश आहे. यात जळगांव शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात उपसंचालक, वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माधवी गांधी यांनी काढले आहेत. मनपात मुख्य लेखा परीक्षक…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याने घरातील मंडळी झोपल्या नंतर मध्यरात्री शेतात जाऊन आत्महत्या करण्याची तयारी केल्यानंतर नातेवाईकांना ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिल्यानंतर आत्महत्या केली यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील कैलास धनसिंग पाटील (५५) वर्षीय शेतकऱ्यारी आहे. त्यांने मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्याचं पाहून घराबाहेर पडल्यावर रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडून जातोय’ अशी माहिती दिली. झोपेत असणारे हे चारही जण खडबडून जागे झाले. त्यांनी कसलाही विचार न करता, बॅटरी घेऊन काळोखातून मार्ग काढत शेताच्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान शेताच्या दिशेनं बॅटरी चमकल्याचं दिसताच पाटील…
धरणगाव प्रतिनिधी(अमोल पाटील): शासनाने शेतकऱ्यांसाठी मीच नोंदविणार माझा पीक पेरा असे अँप सुरू केले या अँप वर शेतकऱ्यांना आपला स्वतः चा पेरा नेदविता यावा यासाठी धरणगांव तालुक्यातील दोनगांव खु येथील तलाठी व पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.धरणगांव तालुक्यातील दोनगांव खु येथे माझी शेती माझा सातबारा ,मीच नोंदविणार माझा पीक पेरा या धर्तीवर राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या स्वतः चा पीक पेरा मोबाईल द्वारे लावता यावा यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, प्रांतधिकारी विनयजी गोसावी,तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात ई पिकपेरा प्रशिक्षण घेण्यात येत आहेदोनगांव खु येथे देखील याच पद्धतीने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोनगांव खु पोलीस…
जळगांव प्रतिनिधी: जिल्ह्यातील चाळीसगाव शहरासह गावांना पुराने वेढले होते मात्र पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने जोमाने कामे व मदत कार्य सुरू केले आहे पूरपश्चात परिस्थितीत स्वच्छता, मदत आणि पुनर्वसनाचे मुद्दे महत्वाचे ठरणार असून तितुर,डोगरी नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगावमधील एकूण ३८ गावे बाधीत झाली आहे. 661पशूंहानी झालिअसून 675 घराची अंशतः व पूर्ण घराची पडझड झाली आहे 300 दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे काल चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला असतांना रात्रभरापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.काल दिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडतच असल्याने सर्वच जण धास्तावले होते. तथापि, सायंकाळपासून पावसाने बर्याच…
जळगांव प्रतिनिधी : शहरासह गावांना पुराने वेढले आहे यामुळे नागरिकांना उघड्यावर किंवा मंगल कार्यालयात आश्रय घ्यावा लागला आहे घरात पाण्यात शिरल्या ने खाण्यासाठी काहीच नसल्याने या नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन धावून आले असून त्यांच्यासाठीअन्नाच्या पाकीट व पाण्याचे बाटल्या चाळीसगावला रवाना केल्या आहेत. चाळीसगाव येथे तीतुर नदीला आलेल्या महापूर मुळे बरेच लोक पुराचे संकटात अडकले असलेने पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी ,उपविभागीय पोलीस अधिक्षक कुमार चिंता सो यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे आलेले पुरामुळे निर्माण झालेले संकटात मदत करने साठी सूचना दिल्या होत्या त्या नुसार पोलीस निरिक्षक जिल्हापेठ,पो नी जळगाव शहर ,पो नि MIDC,पो नि रामानंद नगर पोलीस…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- सोमवारी रात्री अतिवृष्टीमुळे तितुर डोंगरी नद्यांना पूर आल्यामुळे चाळीसगाव शहरात शहर इतर गावांमध्ये घरांचे शेतीचे जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील वाकडी येथे पोहोचले असता त्याठिकाणी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण व संपूर्ण यंत्रणा आदी उपस्थित होते दोन्ही आधी माझी पालकमंत्र्यांनी संयुक्तिक वाकडी गावाची पाहणी केली. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी महसूल विभागाला दिले याच वेळी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी म्हणून संपूर्ण परिस्थिती ची माहिती जाणून घेतलीसोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या…
जळगाव प्रतिनिधी:- कोरून रुग्णाची संख्या राज्यात कमी झाली असली तरी राज्य सरकार सण साजरे करण्यासाठी परवानगी देत नाही आहे याचा निषेध व्यक्त करीत आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कोर्ट चौकात बालगोपालांच्याहस्ते दहिहंडी फोडण्यात आली. सविस्तर असे की, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी स्मित चौधरी, हर्षल निकम आणि तेजस रोटे या…
जळगाव प्रतिनिधी :- प्रभारी सरपंच याच्या मनमानी कारभार विरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नाही पाचोरा तालुक्यातील डाभुर्णी च्या सरपंचवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून प्रतिभा परदेशी या महिलेने आज पासून आमरण उपोषण ला सुरुवात केली आहे .उपोषणकर्त्या महिला प्रतिभा परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील डांभूर्णी येथील रहिवाशी असल्याने त्यांच्या ताब्यातील व मालकीची जागेवर अनधिकृपणे प्रभारी सरपंच संतोष नवलसिंग परदेशी यांनी जागेवर कब्जा केला आहे. याबाबत पाचोरा गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली व त्यांनी याचा निवाडा केला होतो. परंतू प्रभारी सरपंच संतोष परदेशी यांनी सदरील जागवेर पत्र लावून ग्रामपंचायतीच्या ताब्यात जमा केली आहे. या जागेवर भोगवटा म्हणून आमचे…
कन्नड घाटात दरड कोसळली तर तितूर डोंगरीच्या पूरात दोन जण अडकल्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !लाइव्ह महाराष्ट्र न्यूज :- हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात अतीवृष्टीचा इशारा दिला असून सोमवारी रात्री चाळीसगाव तालुकापरिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली.तसेच मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्यातून किमान १५००क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून हि वाहतूक नांदगाव शिवूर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वपक्षीय पॅनल साठी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला असून पाच वर्षात 4 चेअरमन व चार व्हाईस चेअरमन असणार आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते भाजपनेते गिरीश महाजन हे सर्वपक्षीय बैठकीला उशिरा पोहोचल्याने तर्क वितर्क लढवले जात होते. परंतु बैठकीच्या शेवटच्या अर्धा तास अगोदर पोहोचल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.जिल्हा बँक चेअरमन पदाचे कसे राहील असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पाच वर्षात सव्वा सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला. तसेच या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजपा नेते…

