भडगाव तालुक्यात आई-वडिलांसमोरच घडली घटना ! जळगाव / पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरच्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. १७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दि. १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी : शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे एका तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. किशोर अशोक सोनवणे वय-३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव, असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर सोनवणे हा आपला परिवारासह वास्तव्याला आहे. किशोर सोनवणे काही जणांसोबत जुना वाद होता. या वादातून हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे हा जेवण करण्यासाठी बसलेला…
जळगाव प्रतिनिधी : शहरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एका तरूणाने राहत्या घरात छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सनी ईश्वरलाल केसवानी (वय ३६, रा.गणेश नगर, जळगाव)असे मयत उद्योजकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सनी ईश्वरलाल केसवानी हा तरूण आपल्या कुटुंबासह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्याला होता. जळगाव एमआयडीसी येथे त्याची स्वतःची कंपनी आहे. त्यानुसार तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सनी केसवानी यांची पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी तो एकटाच होता.…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज जळगाव – तालुक्यातील कडगाव येथील ४७ वर्षीय महिलेचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवर घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सरलाबाई ईश्वर पाटील वय ४७ रा. कडगाव ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.जळगाव तालुक्यातील कडगाव येथे वास्तव्याला असलेल्या सरलाबाई पाटील या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४३५च्या ११ आणि १३ च्या दरम्यान सरलाबाई पाटील या रेल्वे…
धरणगाव (प्रतिनिधी) सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ व जळगाव ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत नेमका कोणाचा विजय होईल, याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल व विधानसभेत उमेदवार कोण असतील?, ही निवडणूक कशी झाली?, निकालात कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम दिसून येईल,, आदी विषयांवरील चर्चा सुरु आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ म्हटले की, सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव. यावेळेसही पालकमंत्री जळगाव ग्रामीणमधून आपले नशीब आजमावतील हे स्पष्ट आहे. परंतू महाविकास आघाडीतून त्यांच्यासमोर कोण उभे राहणार? आणि तो उमेदवार गुलाबभाऊंसमोर टिकाव धरू शकेल की नाही?, याची देखील चर्चा आतापासून सुरु झाली…
कमी वेळेत सूक्ष्म नियोजनाचे उत्तम उदाहरण ठरली लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीमध्ये नियोजनात “परफेक्ट” असलेला पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याची व्यक्त होत आहे चर्चाजळगाव : देशाची सर्वोच्च निवडणूक म्हणजेच लोकसभा निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय वारे वाहू लागले होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने तात्कालीन खासदार उन्मेश पाटील व युवा चेहरा व नियोजनात ज्यांचा हातखंड आहे असे पारोळा नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांनी विचारकरून अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश होण्याचे चर्चा सुरू असताना सर्वांनी गृहीत धरले होते की ही उमेदवारी उन्मेश पाटील किंवा त्यांच्या परिवारात दिल्या…
विजय पाटील जळगाव । प्रतिनिधी । एरंडोल तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरणात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. सन १९७८ साली महेंद्रसिंग पाटील हे जनता पक्षाकडून निवडणूक लढवून एरंडोल आणि पारोळा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर ते केवळ १८ महिने आमदार राहिले. त्यानंतर १९९५ मध्ये जनता दल पक्षातून पुन्हा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष…
जळगाव विजय पाटील : देशाची लोकसभा निवडणूक आता चौथ्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. रावेर मतदार संघात आपल्या सूनबाईंसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेतले आहे. तसे खडसे हे राज्यातले मोठे तसेच कुठली गोष्ट लक्षात ठेवणारे नेते म्हणून ओळखले जातात. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मधुकरराव चौधरी, हरीभाऊ जावळे, सुरेश जैन, संतोष चौधरी, अशा अनेक नेत्यांचे राजकारण संपविण्याचे काम खडसे यांनी केले हे सर्वश्रुत आहे. जिल्ह्यात खडसेंना जड गेले ते गिरीश महाजन. संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक गिरीशभाऊ वेळोवेळी त्यांना पुरून उरले. परंतु यावेळी खडसेंनी थेट दिल्ली गाठत सुनेचे तिकीट मिळविले. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना जुन्या मैत्रीची आठवण करून देत…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी बाहेरचा उमेदवार लादला. उमेदवार श्रीराम यांच्या मॅनेजमेंटची धुरा दर्जी यांच्यावर सोपवले आहे परंतु चहापेक्षा किटली गरम असा प्रकार या मतदारसंघात झाला असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहे. दर्जीचा वागणुकीचा फटका श्रीरामाच्या बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक वातावरण आहे परंतु सर्व काही पैशाने होत नाही यासाठी उमेदवारास जीवाभावाची टीम देखील आवश्यक असते. परंतु उमेदवार श्रीरामाच्या अवतीभवती दर्जीने कवच केल्याने कोणालाही काही उमजत नाही अशी परिस्थिती उमेदवाराच्या बाबतीत झालेले आहे. रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : विजय पाटील : देशात मोदी शहा यांच्या दंडलशाही विरुद्ध सर्व विपक्ष पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी याची नर्मितिी करण्यात आली या आघाडीमध्ये आम आदमी पार्टी सामील आहे. इंडिया आघाडी मार्फत 2024 लोकसभा एकत्रितपणे संपूर्ण देशात लढण्याचा नर्धिार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील 2024 लोकसभा एकत्रितपणे लढवण्यिाचे ठरले आहे. मात्र रावेर मतदारसंघात आम आदमी पार्टीला महाविकास आघाडी कडून बगल दाखवली जात आहे. रावेर मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवार मा श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आप चे जल्हिाध्यक्ष मिलिंद चौधरी व जल्हिा समन्वय योगेश हिवरकर यांनी सदच्छिा भेट घेऊन आम्ही आपला प्रचार…

