Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीच्या निधनानंतर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल ; चाळीसगाव तालुक्यातील घटना
    अमळनेर

    पतीच्या निधनानंतर पत्नीने उचलले टोकाचे पाऊल ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

    editor deskBy editor deskDecember 17, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील बहाळ येथील व्यावसायिक संदीप रामभाऊ पाटील (वय ३४) यांचे सात दिवसापूर्वी अपघातात निधन झाले. पतीच्या निधनाचा विरह व दु:ख, वियोग पत्नीला सहन न झाल्याने तीने पतीच्या पाठोपाठ सातव्या दिवशीच आज दि.१६ रोजी सकाळी ५:३० वाजता विषारी किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी व मन सुन्न होणारी घटना घडली.

    बहाळ ता.चाळीसगाव येथील रहिवासी असलेले संदीप रामभाऊ पाटील यांचे दि.१० रोजी सुरत येथे लिंबू घेऊन जात असतांना रात्री १०:४५च्या सुमारास खडकी फाटया जवळ त्यांच्या मालकीच्या माल वाहतूक गाडीला भीषण अपघात होऊन झाला. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. यात संदीप पाटील व समोरील गाडीच्या ड्रायव्हरचा देखील जागेवरच मृत्यू झाला. तर दोन्ही गाडीतील चार जण जखमी झाले. संदीप पाटील हे गेल्या १५ वर्षापासून मालवाहतूक व्यवसाय करत होते. गांव परिसरात अनेकांशी सलोख्याचे व जिव्हाळयाचे त्यांचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूने बहाळ गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

    अमळनेर तालुक्यातील झाडी शिरसाळे येथील माहेरवाशीन असलेल्या दीपालीने पतीच्या अपघातात मृत्यू झाल्या दिवसापासून अन्न पाणी त्याग करून त्यांच्या वियोगात वेडीपिसी झाली होती. ती भानावर व शुध्दीवर देखील नव्हती. तिला सांभाळणे कुटुंबासाठी मोठे आवाहन होते. कुटुंब मोठ्या वियोगात असल्याने अनेकांनी संदीपच्या घरी जाणे येणे थांबवले. पण त्यांच्या पत्नी मात्र हे दुःख विसरणे कठीण होते. अशा परिस्थितीत तिला परिवार सांभाळत होता. नियतीला मात्र काही वेगळेच मान्य होते. तिने कुटुंबापासून वेगळे कारण सांगून स्वतःला बाजूला सारून दि.१६ रोजी सकाळी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास दीपालीने (वय ३० ) हीने विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केली. दीपालीने आपल्या मागे कोणाचाही विचार केला नाही . आपल्या मागे दोन कोवळ्या लहानग्या बाळांचा सांभाळ पुढे कोण करेल त्यांचे पुढे कसे होईल? हा विचार देखील या मातेला आला नसावा का? म्हणतात ना जाणाऱ्याला मृत्यू जवळचा वाटतो म्हणून दीपालीने हे टोकाचेे पाऊल उचलून पतीच्या विरहाने,दु;खाने तिने विषारी किटकनाशक घेऊन आपली जीवनयात्रा संपून घेतली. ही दुदैवी घटना समाज मनाला चटका लावणारी घडली आले नियतीच्या मनात येते तेव्हा तेथे कोणाचे चालत नाही मृत्यू हा नियती ठरवत असते असे बोलले जाते. या लहानग्या बाळाचे अपघातात सात दिवसापूर्वीच पितृछत्र हरपले होते हे दु:ख विसरत नाही तोच आईने देखील या चिमुरडयांना अशा पद्धतीने सोडून जावे का? अशी हृदयद्रावक दुदैवी घटना बहाळ गावात व परिसरात घडली आणि मोठी हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे. दि.१६ रोजी शवविच्छेदन करून या दोन्ही चिमुकल्यांनी वडिलांच्या अपघाती निधनानंतर मोठ्या शोकाकुल वातावरणात आईला अग्नीडाग दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025

    भाजप उमेदवाराकडून ठाकरे गटाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न !

    December 20, 2025

    मालवाहू वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टरवरील मजुराचा बळी

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.