Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार, बँकांवर नाही ; मुख्यमंत्री
    राजकारण

    कर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार, बँकांवर नाही ; मुख्यमंत्री

    editor deskBy editor deskMarch 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कर्जमाफीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेचा नायनाट झाला आहे.

    मुख्यमंत्र्यांनी याआधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र काही माध्यमांत आणि राजकीय वर्तुळांमध्ये, ही कर्जमाफी कुठल्या बँकेकडून घेतलेल्या कर्जावर लागू होणार नाही याबाबत वेगवेगळे दावे होऊ लागले होते.

    मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, “मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात – कुणी म्हणतो राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचे होणार नाही, कुणी म्हणतो या सोसायटीचे होणार नाही. पण सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेने दिलेले कर्ज २ लाख रुपयांपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.” मुख्यमंत्र्यांनी यावर भर देत सांगितले की, “केवळ आमचा प्रयत्न हा आहे की माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. आम्ही ३० जूनच्या आधी ही कर्जमाफी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबतही माहिती दिली. त्यांनी दावा केला की, हा प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून निधी मिळाला, मात्र विदर्भाची बाजू दुर्लक्षित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “हा प्रकल्प आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पात समावेश केला आहे. त्यामुळे विदर्भाचे जलसंपन्नतेचे चित्र पूर्णपणे बदलेल.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    युद्धाची आग भडकली; शांततेसाठी भारत पुढे यावा” : अण्णा हजारे यांचे मोदींना पत्र

    March 7, 2026

    वैद्यकीय विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय; वसतिगृह संचालकाविरोधात गुन्हा

    March 7, 2026

    मध्यपूर्वेतील तणावाचा फटका; गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महाग

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.