Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !
    क्राईम

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    editor deskBy editor deskJanuary 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत सासुरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

    सागर दिलीप बिऱ्हाडे (वय ३६, रा. राजमालती नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गेल्या सात वर्षांपासून पत्नी व चार मुलांसह आव्हाणे येथील सासुरवाडीला राहण्यासाठी गेला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २२) रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे याचा गावातील काही तरुणांसोबत किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो जमिनीवर कोसळला आणि जागेवरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    मारहाणीनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सागर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

    घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मयत सागर बिऱ्हाडे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    आधार ‘केवायसी’ अपडेटच्या नावाखाली तरुणाची साडेपाच लाखांत फसवणूक !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.