Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “संचार साथी म्हणजे ‘पेगासस’च : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप”
    राजकारण

    “संचार साथी म्हणजे ‘पेगासस’च : उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप”

    editor deskBy editor deskDecember 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘संचार साथी’ अॅपमागे मुळात हेरगिरीसाठी वापरले जाणारे पेगासस तंत्रज्ञानच वापरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना केली.

    ठाकरे म्हणाले, “लोकांनी ज्यांना मतदान केले, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर पाळत ठेवावी. दिल्लीतील बॉम्बस्फोट, पहलगाममधील घुसखोरी – या प्रश्नांवर सरकारचे मौन चिंताजनक आहे.” ठाकरे यांच्या शिवसेनेत आज पुन्हा अनेक कार्यकर्त्यांनी पुनर्प्रवेश केला. “गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, बाचाबाची सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते परत येत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

    केंद्राच्या नामांतर धोरणावर टीका करत ठाकरे म्हणाले, “राजभवनाचे ‘लोकभवन’, पीएमओचे ‘सेवातीर्थ’—असे नावांमागे सरकार आणखी गुप्त खेळ करते आहे. पेगाससचे संचार साथी करण्यात याचाच भाग आहे.” तसेच एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर प्रहार करत ठाकरे म्हणाले, “पुढील महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होत असताना सत्ताधाऱ्यांतच हाणामाऱ्या, पैशांची उधळण सुरू आहे. धाडीही निवडक पद्धतीने टाकल्या जात आहेत.”  “भाजप म्हणजे देशाचा तारणहार असा समज करून देणे हा मोठा घोटाळा आहे. अनेकजण आता जागे होत आहेत. आगामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.