Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !
    राजकारण

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    editor deskBy editor deskDecember 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था 

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडत असून नगर परिषद, नगर पंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र यात मोठा बदल करण्यात आला आहे. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होईल, परंतु निकाल मात्र 21 डिसेंबरलाच जाहीर केले जातील.

    निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान, काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने मतदानाच्या दोन दिवसापूर्वी राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती. परंतु सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर झाले पाहिजे. अन्यथा उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. परंतु या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो, हे पाहुयात…

    ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत प्रशासनाला राखीव ठेवावे लागणार आहे. सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. ही मोठी जबाबदारी राहणार आहे.

    स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. ती प्रक्रिया 21 नोव्हेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांना सातत्याने करावी लागणार आहे. त्यामुळे एकंदरीतच निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडल्याने साधारणपणे तीन आठडवडे पोलिस यंत्रणा, निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना आणि प्रशासनाला सजग राहावे लागणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.