Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
    क्राईम

    भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

    editor deskBy editor deskJune 30, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील बामनोद येथे कामानिमित्त आलेले तिघे मित्र हे जळगाव कडे परत जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांना वळण रस्त्यावर जोरदार धडक दिल्याने यामध्ये दुचाकी वरील जळगाव चा तरुण जागीच ठार झाला असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर घडली. मयूर अण्णा गवळी असे जागीच मयत तरुणाचे नाव असून त्याचे इतर दोन मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ गुळाची ‘महाबासुंदी’ नावाने चहा विक्रीचा व्यवसाय करणारे मयूर अण्णा गवळी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रविवारी ते आपले मित्र जयेश पाटील आणि गोयर यांच्यासोबत दुचाकीवरून बामणोद येथे गेले होते. तेथून परत येत असताना रस्त्याच्या वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव  एसटी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मयूर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

    या अपघातात जखमी झालेल्या जयेश पाटील आणि गोयर यांना तात्काळ भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मयूर गवळी हे जळगावात ‘महाबासुंदी’ चहा विक्रेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा मनमिळाऊ, हसतमुख स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच अनेक नातेवाईक, मित्र आणि परिचितांनी घटनास्थळी गर्दी केली. मयूर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.