Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात काम करीत असतांना युवकाचा मृत्यू !
    क्राईम

    शेतात काम करीत असतांना युवकाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शेतात वखर चालवतांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वखरला वायरच्या तारांचा स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय तरुणास विजेचा जबर धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील वणगाव येथील प्रमोद विष्णू जंजाळ (वय १७) हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. २८ जून रोजी सकाळी शेतात वखर चालवायचे असल्याने आई, वडिल व प्रमोद हे शेतात गेले होते. दरम्यान, प्रमोद हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील शेतासाठी विजेची वायर जमिनीवरुन टाकण्यात आली होती. ही वायर प्रमोद याच्या निदर्शनास आली नाही. नेमके वखरमुळे ही वायर तुटली व वायरच्या तारांचा स्पर्श वखरला झाला. तर प्रमोद याच्या हातात वख्खरचा दांडा असल्याने त्यास विजेचा जबर धक्का लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार शेजारी काम करणाऱ्या त्याच्या वडिलांच्या लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने प्रमोद यास तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तपासणी करुन वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमोद यास मृत घोषित केले. या वेळी आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला. विष्णू जंजाळ यांना प्रमोद हा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी वणगाव परिसरात पोहोचल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग केली आहे.

    शेजारच्या शेतकऱ्याने विष्णू जंजाळ यांच्या शेतातून थेट जमिनीवरुच विजेची वायर टाकल्याने माझ्या निष्पाप मुलास जीव गमवावा लागल्याची माहिती माध्यमांशी बोलताना विष्णु जंजाळ यांनी स्वतः दिली. मयत प्रमोद याच्या पश्चात्य आई, वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. कष्टाळू व मेहनती तसेच अभ्यासात हुशार अशा प्रमोदच्या अकस्मात मृत्यूने वणगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.