Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात मोठी कारवाई : बोगस लग्न लावणारी महिलांची टोळी अटकेत
    एरंडोल

    जिल्ह्यात मोठी कारवाई : बोगस लग्न लावणारी महिलांची टोळी अटकेत

    editor deskBy editor deskMay 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आधीच विवाहित आणि माता असलेल्या महिलांचे अविवाहित तरुणांशी विवाह लावून लाखो रुपयांत फसवणूक करणारी पाच महिलांची टोळी सोमवारी कासोदा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात मोना दादाराव शेंडे (२५), सरस्वती सोनू मगराज (२८, दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (२६, रा. पांढुर्णा, मध्य – प्रदेश), सरलाबाई अनिल पाटील (६०) आणि उषाबाई गोपाल विसपुते (५०, दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव) यांचा – समावेश आहे. पाचही महिलांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गरजू उपवर तरुणांना हेरून त्यांना मध्यस्थांमार्फत मुली दाखवून लग्नासाठी २ ते ५ लाख रुपये उकळण्याचे त्यांचे उद्योग होते. विशेष म्हणजे, यातील तीन तरुणींचे यापूर्वीच लग्न झालेले असून, त्यांना मुलेही आहेत. सरला पाटील व उषाबाई विसपुते यांनी २१ एप्रिल रोजी पहिल्या तीन तरुणींचे कासोदा येथील तीन तरुणांसोबत लग्न लावून दिले होते. या लग्नासाठी तीनही मुलांच्या परिवाराकडून एकत्रित ४ लाख १३ हजार रुपये उकळले होते. कासोदा येथे या टोळीने दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाकडून पाच लाख रुपये उकळले.

    मात्र, लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासातून पोलिस या महिलांपर्यंत पोहोचले. साधारण १५ दिवसांपूर्वीच विवाह झालेला असल्याने या तीन महिला कासोदा येथे होत्या. त्यांना अटक करण्यात आली. यानंतर लग्न लावून देणाऱ्या नांदेड येथील महिलांना जेरबंद करण्यात आले. स.पो.नि. नीलेश राजपूत, सहायक फौजदार रवींद्र पाटील, मनोज पाटील, पो.हे.कॉ. राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्रान पठाण, जितेश पाटील, नितीन पाटील, सविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026

    मुंब्रा विजय भाषणातील वक्तव्यावरून वाद; सहार शेख यांचा खुलासा व माफी

    January 24, 2026

    फॉरेन्सिक अहवालातून धागेदोरे; अभिनेता केआरके गोळीबार प्रकरणात ताब्यात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.