Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात अवकाळी पाऊस : पालकमंत्र्यांनी दिली पंचनामा करण्याचे आदेश
    चाळीसगाव

    जिल्ह्यात अवकाळी पाऊस : पालकमंत्र्यांनी दिली पंचनामा करण्याचे आदेश

    editor deskBy editor deskFebruary 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दि.२६ रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले, सुलतानी संकट तर आहेच पण कालचा अस्मानी संकटांने हाता तोडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यावर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ पंचनामा करावा असे आदेश देखील दिल्याचे समोर आले आहे.

    जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा तालुक्यात रात्री अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. तर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दि २६ रोजी रात्री तालुक्यातील तामसवाडी, बोळे, वसंतवाडी, टोळी, मोंढाळे, प्र अ बहादरपुर, तामसवाडी, बोळे, या परिसरात रात्रीच्या सुमारास पावसासह गारपीटीने तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मका वादळ वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे आडवा पडला असल्यामुळे शेतकऱ्यांवर हंगाम कापणीवर असताना अवकाळीने संकट ओढवले आहे.

    दि. २६ रोजी रात्री ९ ते ९. ३० वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यात गारांचा पाऊस झाला, बोरांच्या आकाराची गार पडली. पारोळा तालुक्यात तामसवाडी, बोळे, वसंतवाडी, टोळी, तरडी, शेवगे या भागातरात्री ९ ते ९. ३० वाजेच्या सुमारास काही वेळ गारपीटीचा तडाखा झाला. तसेच पारोळा तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली . नुकसानभरपाईची मागणी अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने त्वरित सरसकट या भागात नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.