Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskDecember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जीवनात प्रयत्नांत यश असते. समाजाप्रती पूर्वीच्या गुरुजी विषयी असलेली प्रतिमा शिक्षकांनी जोपासावी. अवगत असलेले गुण विद्यार्थ्यांनी जोपासून विविध नैपुण्य प्राप्त करून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील सर हे होते.

    शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे येथील स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा येथे जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन पालक मंत्री ना गुलाबराव पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ.अनिल झोपे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, स्वामी समर्थ ग्रुप चे अध्यक्ष मनोज कुमार पाटील, गटशिक्षणाधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अधीक्षक विजय पवार, मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागतगीताने विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली.

    याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शालेय जीवनातील गमती सांगितल्या, DPDC मधून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंग, स्वच्छता गृह व शौचालय व वर्ग खोल्यांच्या दुरुस्ती आणि बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी मजूर केल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मोबाईल चे दुष्परिणाम सांगून त्यापासून लांब राहावे असा विद्यार्थ्यांना उपदेश करून अशा विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील, देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव वैज्ञानिक दृष्टी ने समृध्द होण्यास मदत होईल. विज्ञानाचे फायदे आणि तोटे असले तरी त्यातून काय घ्यावे याची मुलांना जाणीव होण्यासाठी अशी प्रदर्शने निश्चित फलदायी ठरतात. तर प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जीवनात स्पर्धेला महत्व असून विद्यार्थ्यांनी कठोर तयारी करावी. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा. समाजातील अज्ञान अंधश्रद्धा नाहीशी व्हाव्यात हेच या प्रदर्शनाचे फलित असेल. चांगले नागरिक निर्माण होण्यास मदत होईल.असे सांगितले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. आभार गट शिक्षणाधिकारी खलील शेख यांनी मानले. बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल अहिरे यानी केले.सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सुमारे १२५ उपकरण व साहित्याची मांडणी करण्यात आली होती. स्वामी समर्थ शाळेच्या शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.