Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला संपविले !
    Uncategorized

    सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला संपविले !

    editor deskBy editor deskDecember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कल्याण : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत तिची हत्या करणाऱ्या तिचा प्रियकर भूपेंद्र गिरी याला बेड्या ठोकल्या आहेत. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत महिला ज्योती तोरडमध्ये आणि भूपेंद्र गिरी यांचे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र ज्योती भूपेंद्र सोबत राहण्यास तयार नव्हती. त्यामुळे संतापलेल्या भूपेंद्रने ज्योतीची लॉजमध्ये गळा आवळून हत्या केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील तृप्ती लॉजमध्ये ज्योती तोरडमल हिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला. डीसीपी सचीन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पालिस निरिक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. आरोपी भुपेंद्र गिरीचा शोध सुरु केला. भूपेंद्र आणि ज्योती शनिवारी ३ वाजता तृप्ती लॉजमध्ये आले होते. रविवारी सकाळी ज्योती हिचा गळा आवळून भुपेंद्र हा पसार झाला होता. लॉजमधील मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. तांत्रिक पद्धतीने तपास करुन पोलिसांनी भूपेंद्र याचा पाठलाग सुरु केला. सोलापूर उस्मानाबाद हायवेवर तो एका ठिकाणी सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

    ज्योती आणि भूपेंद्र यांचे पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. भूपेद्र हा विवाहित होता. त्याचा पत्नीचा मृत्यू झालेला आहे. ज्योती देखील एका व्यक्तीसोबत कल्याण पूर्वेत राहते. जेव्हा ज्योती भूपेंद्रला भेटण्यासाठी तृप्ती लॉजमध्ये आली. तेव्हा त्याने तिच्याकडे एक अट ठेवली. तू माझ्यासाेबत चल आणि माझ्यासोबत राहा. परंतू ज्योती तयार नव्हती. या कारणावरुन दोघांचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्याने ज्योतीचा गळा आवळला. त्यानंतर तोंडावर उशी ठेवून तिला जीवे ठार मारले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    October 13, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.