Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावाची बदनामी होतेय म्हणत सहा जणांनी केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य !
    क्राईम

    गावाची बदनामी होतेय म्हणत सहा जणांनी केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य !

    editor deskBy editor deskSeptember 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

     

    देशभरातील अनेक राज्यात महिलासोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता बिहार राज्यातील एका आदिवाशी महिलेवरती सहा जणांनी अत्याचार केल्याचं एक प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालं आहे. ज्या महिलेने आरोप केले आहेत. त्या सहापैकी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण बिहार राज्यातील आहे, बिहार राज्यातील मुंगेर येथील आदिवासी महिला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी सुध्दा त्या महिलेवरती आरोप केले आहेत. हा गुंता सोडवताना पोलिसांनी दमछाक झाली एवढं मात्र नक्की आहे.

    पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सागर हंसदा, हट्टू हंसदा, शिवा टुड्डू, मुकेश हंसदा आणि बट्टू उर्फ सूरज कुमार अशी त्यांची नावं आहेत. सगळ्या आरोपींची लग्न झालेली आहेत. त्याचबरोबर पीडित महिलेंच सुध्दा लग्न झालेलं आहे. त्या पीडित महिलेचा पती नोकरी निमित्त बाहेरगावी आहे. पीडित महिला गावात आपले सासरे आणि मुलगी सोबत राहत आहे. महिलेचं लग्न झालेलं असताना सुध्दा महिला दुसऱ्या तरुणांसोबत गावाच्या बाहेर येते जाते. त्यामुळं त्यांच्या गावाची बदनामी होत आहे. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की, बाहेर जात आहेस, तर तिकडेचं राहा. इकडं कशाला परत येतेस असा आरोप केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली. त्यामध्ये त्याने सांगितलं, दुसऱ्या लोकांनासोबत तुझे संबंध आहेत. आमच्यासोबत सुध्दा संबंध ठेव, ती महिला हे सगळं करायला तयार झाली नाही, मग सगळ्यांनी बलात्कार केला.

    गावातल्या काही लोकांनी सांगितलं की, ती महिला २० दिवसांपूर्वी तिच्या भाच्यासोबत जयपूरला निघून गेली होती. ती महिला गावात परतल्यानंतर गावातल्या काही लोकांनी त्या महिलेला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी गावातली बदनामी होत असल्याचं सांगितलं. ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेले सहा आरोपी त्या महिलेच्या घरी गेले, त्यावेळी त्या महिलेला सांगितलं की, बैठकीला बोलावलं आहे. ती महिला त्यांच्यासोबत निघून गेली, त्यावेळी तिथल्या डोंगराच्या खाली सोबत असलेल्या लोकांनी त्या महिलेवरती बलात्कार केला. त्यानंतर ती महिला कशीबशी तिच्या घरी पोहोचली, त्यानंतर या घटनेची माहिती सासरे आणि गावातल्या लोकांना दिली.

    #police Bihar Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.