मुंबई : वृत्तसंस्था
सातारा शहरातील एका नामवंत हॉटेलमध्ये धुमधडाक्यात साखरपुडा झाला. या साखरपुड्यात ९ लाख ६३ हजार रुपये खर्च केला. मात्र, त्यानंतर लग्न न करताच मुलाकडील मंडळींनी फसवणूक केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सातारा शहर याप्रकरणी एका डॉक्टरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. गिरीश बाळकृष्ण कदम, बाळकृष्ण बाजीराव कदम, शीला बाळकृष्ण कदम (रा. शाहूनगर, गोडोली सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे ७० वर्षांचे असून, ते मूळचे मुंबईचे आहेत. त्यांच्या डॉक्टर असलेल्या मुलीसोबत वरील संशयितांनी साताऱ्यातील एका नामवंत हॉटेलमध्ये साखरपुडा केला होता. लग्न मोडल्यामुळे सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसानही झाले असल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.


