Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन बायकांना रहायचे एकाच नवऱ्यासोबत ; कोर्टाने दिला असा निकाल !
    राष्ट्रीय

    दोन बायकांना रहायचे एकाच नवऱ्यासोबत ; कोर्टाने दिला असा निकाल !

    editor deskBy editor deskAugust 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    सध्या सोशल मिडीयावर आपण अनेक व्हिडीओ बघत असतो, यात नवरा बायकोचे भांडण देखील असते तर नवऱ्यासोबत प्रेयसीला बघून बायको नवऱ्याची धुलाई केली असल्याचा देखील आजवर व्हिडीओ पाहिले आहे पण हि घटना वेगळीच आहे. चक्क दोन बायकांना एका नवऱ्यासोबत राहण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

    एका व्यक्तीने दोन लग्न केली. दोन्ही बायकांना नवऱ्यासोबतच रहायच होतं. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं. त्यावरुन त्यांच्यात भांडण सुरु होती. अखेर हे प्रकरण परामर्श न्यायालय गेलं. त्यात न्यायालयाने दोघींना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. घटिया येथे राहणाऱ्या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी बामोरा येथे राहणाऱ्या महिलेबरोबर लग्न केलं. काही काळापर्यंत पती-पत्नीमध्ये सगळं काही सुरळीत सुरु होतं.

    त्यांना एक मुलगाही झाला. हळूहळू पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयात या प्रकरणात निकाल लागायला 15 वर्ष लागली. त्या व्यक्तीला आपल्या पत्नीसोबतच रहाव लागेल, असा कोर्टाने आदेश दिला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील हे प्रकरण आहे.

    न्यायालयाने त्या व्यक्तीला पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले. पण त्या 15 वर्षात खटला सुरु असताना, त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं. त्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिली पत्नी त्या व्यक्तीसोबत रहायला त्याच्या घरी गेली. यामुळे त्याच्या संसारात वादळ निर्माण झालं. कारण दोघींना नवरा हवा होता. पण त्यांना एकत्र रहायच नव्हतं. त्यावरुन पुन्हा वाद झाला. त्याची दुसरी बायको नवऱ्याला सोडून उज्जैन येथे आपल्या माहेरी निघून गेली. त्या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने परामर्श केंद्रात तक्रार दाखल केली होती. पती सोबत राहण्यासाठी तिने ही तक्रार केली होती. परामर्श केंद्राने त्या व्यक्तीला आणि त्याच्या दोन्ही बायकांना बोलवून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही बायका ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. अखेर परिवार परामर्श न्यायालयाने एक निर्णय दिला. त्यामध्ये पतीला पहिले 15 दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि नंतरचे 15 दिवस दुसऱ्या पत्नी सोबत रहाण्याचा आदेश दिला.

    court social media
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई आमचीच : ठाकरेंच्या विधानाने चर्चेला उधान !

    November 15, 2025

    “जो जीता वही सिकंदर : फडणवीसांचा शरद पवारांना करारा टोला !

    November 15, 2025

    आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू.पण… सुजात आंबेडकर !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.