• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संरक्षण मंत्र्यांनी दिला थेट पाकिस्तानला इशारा !

editor desk by editor desk
April 23, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
संरक्षण मंत्र्यांनी दिला थेट पाकिस्तानला इशारा !

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था

देशातील जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे.  यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये  महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असून, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळेल,  दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये या घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली, जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अनंतनागमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून हल्ल्याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये सरकारसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Previous Post

पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्यूमुखी !

Next Post

पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पर्यटकांच्या कुटुंबांचे ना.श्री. गुलाबरावजी पाटील यांनी केले सांत्वन

Next Post

पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पर्यटकांच्या कुटुंबांचे ना.श्री. गुलाबरावजी पाटील यांनी केले सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group