• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंत्री बावनकुळे यांचे थेट राहुल गांधींना आव्हान : हिम्मत असेल तर…

editor desk by editor desk
February 8, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मंत्री बावनकुळे यांचे थेट राहुल गांधींना आव्हान : हिम्मत असेल तर…

पुणे : वृत्तसंस्था

दिल्लीच्या निकालावर काही नेत्यांनी संशय घेतल्याने भाजपचे नेते आता त्या नेत्यावर टीकास्त्र सोडत असतांना आता राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना आवाहन केले. 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीच्या विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. अशातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे. राहुल गांधी म्हणतात की, कामठी विधानसभेत गडबड झाली आहे. त्यामुळे माझे राहुल गांधी यांना आव्हान आहे की, 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढवावी. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढून जिंकून दाखवेन असे बावनकुळे म्हणाले. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहे. राहुल गांधी जर लढायला तयार झाले, तर मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले, डबल इंजिन सरकार विकास करू शकते, हे देशाच्या जनतेने स्वीकारले आहे. मोदी यांच्या नेतृत्वात जनतेला विकास दिसत आहे. त्यामुळे देशाच्या 75 टक्के भूभागावर भाजपचे सरकार आहे. दिल्लीतील विजय ऐतिहासिक आहे. काँग्रेस स्वकर्तृत्वाने दिल्लीत हरली आहे. काँग्रेसने जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. आता काँग्रेस मतदान यंत्राला दोष देईल. सकाळचे नऊचे महान प्रवक्ते बोलायला सुरुवात करतील, असे म्हणत बावनकुळे यांनी नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला.

 

Previous Post

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !
क्राईम

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !

July 18, 2025
ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !
Uncategorized

ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !

July 18, 2025
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !
क्राईम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !

July 18, 2025
“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !
राजकारण

“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !

July 18, 2025
विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !
राजकारण

विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !

July 18, 2025
व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद
क्राईम

व्यापाऱ्याला लुटणारा ‘खेकडा’ अखेर जेरबंद

July 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp