• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नाना पटोलेंनी व्यक्त केला संशय : …तर आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार !

editor desk by editor desk
November 28, 2024
in राजकारण, राज्य
0
नाना पटोलेंनी व्यक्त केला संशय : …तर आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२८) संशय व्यक्त केला आहे. या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.

पटोले म्हणाले की, 7.87 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. 76 लाख मते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान पडलेली आहेत, याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. महाराष्ट्रात 5 लाखांहून अधिक मत आली, मग ती आली कुठून? असा सवालही त्यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला. निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सात वाजता मतदाना झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशीरा देण्यात आला. निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु, ६२.२ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री ११.३० वाजता सांगितले. यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते. तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की, ६६.५ टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे. परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही.

सुमारे ७६ लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे. याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे 2020 ला भाजपचे ठरले होते. पक्ष फोडले, चिन्ह घेतले, न्यायव्यवस्था हाती घेतली. सर्व बेकायदेशीर असुन सुप्रीम कोर्ट लक्ष द्यायला तयार नाही. असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला?, राजकारण सोडलेले बर, अशी उद्विग्नता पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.

Previous Post

झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन

Next Post

भुजबळांचा निशाणा : … म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय !

Next Post
भुजबळांचा निशाणा : … म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय !

भुजबळांचा निशाणा : … म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

जळगावात चारचाकीचा थरार : अनेक वाहनासह महिलेला दिली जबर धडक !

June 20, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group